12/10/2023
मुंबई @ Rajesh Tope #भैय्यासाहेब यांनी आज खा.शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रक्षाताई खडसे यांनी आयोजित केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधीत केले.
यावेळी बोलताना आ.राजेशभैय्या टोपे साहेब म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांच्या पुस्तकांमधून महिलांविषयी असणाऱ्या विचारधारा आपण सर्वांनीच वाचलेल्या आहेत. समाजाने महिलांना कायमच कमी समजले, परंतु महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी उत्कृष्टपणे बजावली आहे. समाजाने महिलांना सन्मान दिला पाहिजे आणि जो समाज महिलांचा आदर करत नाही तो समाज, ते राज्य, तो देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याच दृष्टिकोनातून महिलांचा सन्मान झाला पाहिजे हा महत्त्वाचा विचार आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच दिलेला आहे. साहेब म्हणजे एक विचारधारा आहेत.
पूर्वीच्या काळात स्त्रियांचे सौंदर्य हे सामर्थ्य असायचे, परंतु आता साहेबांच्या पुरोगामी विचारधारेमुळे स्त्रियांना पुढे आणले गेले त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सामर्थ्य हे आता सौंदर्य झालेले आहे. स्त्रिया या सामर्थ्यशाली होऊन आता सुंदर झालेल्या आहेत आणि त्यांनी ते सिद्ध देखील केलेले आहे.
याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री माननीय आमदार अनिल देशमुख, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, पक्षाच्या नेत्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर व महिला कार्यालयीन सचिव स्वातीताई माने यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
https://fb.watch/nDktkCBtcy/?mibextid=Nif5oz